Posts

Showing posts from December, 2020

हरवलेलं ते हास्य...

हरवलेली एखादी गोष्ट पटकन सापडते,पण हरवलेलं हास्य कधीच सापडत नाही...विचारून पाहावं कधी त्याला ज्याचं हास्य त्याच्यासाठी सर्व काही होतं... एखाद्याचं शांत बसणं आपल्याला परवडेल पण हास्याचे केलेलं सोंग कधीच नाही...स्वतःला प्रश्न विचारून पहा कधी,समोरची व्यक्ती खरच हस्तेय की देखावा करतेय...आयुष्य आपलं जोकर सारखं झालंय, स्वतः दुःखाच्या सागरात बुडून इतरांना हास्याच्या लाटांचा आनंद देतोय...खरच हसणं जेवढं सोप्प समजतो तेवढं सोप्प नाही आहे...डोळ्यात अश्रू दाटले असले तरी ते लपवता आले पाहिजेत,नाही का?

एक फोन कॉल...

   एक फोन कॉल आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचा ठरतो,कारण sms करणं त्यावर ईमोजी पाठवणं याने खरच भावना व्यक्त होतात का? भावना व्यक्त होण्यासाठी आपल्याला बोलावं लागतं... आपली जवळची व्यक्ती आपल्यावर कितीही रुसलेली असली तरी त्याच्याशी एकदा आपण फोन वर बोलून घ्या आणि जर ती आपल्यासोबत किंवा आपल्या जवळ असेल तर तिच्याशी भेटून बोला...वाद कमी करण्याचं एकच मध्यम आहे ते म्हणजे संवाद..आपण हक्काने एखाद्यावर नाराज होतो मग त्याच हक्काने त्याला फोन करा आणि व्यक्त व्हा...मग बघा तुमच्या आणि त्याच्या नात्याला पुन्हा नवी पालवी फुटलेली असेल

जात

'जात' हा शब्द जरी ऐकलं ना तर तळपायाची आग मस्तकात जाते.हल्ली आडनाव पाहून माणसाची जात ओळखली जाते...त्यावरूनच त्यांचा धर्म ओळखला जातो...जरी आपण 21व्या शतकात असलो तरीही अजून आपण पुरोगामी विचारांनीच जखडलो गेलोय..माणूस नाही तर सध्या जात महत्वाची ठरते...अपडेटेड मोबाईल वापरतो कारण जुनं version outdated झालेलं असतं, मग नवीन विचार का आपण आमलात आणत नाही...  आडनाव फक्त एक ओळख करून देण्यासाठी आहे...तरी देखील लोकांची मानसिकता अजूनही पुरोगामी विचारात अडकली आहे...एकीकडे आपण सर्व धर्म समभाव मोठ्यापणाने सांगतो...पण वेळ जेव्हा आपल्यावर येते तेव्हा मात्र आपण शांत असतो...कोणाला दोष द्यायचा हेतू नाही माझा , पण पाहिलं तर बऱ्याच गोष्टी आहेत...जात गोत्र धर्म या सगळ्या गोष्टींनी आपल्याला जखडलंय...आता खरच वेळ आहे ती पुरोगामी विचारांच्या पलीकडे पाहण्याची...स्वतः पुढाकार घेऊन या सर्व गोष्टी विसरून एक जुटीने राहण्याची गरज सध्या भासतेय...मी तर जातीयवादाचा विरोधात आहे ,अन तुम्ही???