Posts

“Cockroach Janta Party: मज़ाक नहीं, युवाओं की चीख है”

देश बदलने की ताकत किसी संसद भवन में नहीं, बल्कि उस युवा के भीतर होती है… जो सवाल पूछने की हिम्मत रखता है। आज पूरे देश में “Cockroach Janta Party” नाम गूंज रहा है। कुछ लोग इसका मज़ाक उड़ा रहे हैं, तो कुछ लोग इसे देश के युवाओं की बगावत का नाम दे रहे हैं। लेकिन एक सवाल हर किसी के मन में उठ रहा है — आख़िर ऐसा क्या हुआ कि देश का युवा खुद को “cockroach” कहलाने पर मजबूर हो गया? डॉ. A. P. J. Abdul Kalam कहा करते थे — “देश की असली ताकत उसके युवा होते हैं।” उन्हें विश्वास था कि इक्कीसवीं सदी भारत की होगी… लेकिन शायद उन्होंने ये नहीं सोचा होगा कि एक दिन वही युवा बेरोज़गारी, महंगाई, टूटी हुई व्यवस्था और खोखले वादों के बीच अपने अस्तित्व के लिए लड़ रहा होगा। आज देश का युवा डिग्रियां लेकर सड़कों पर घूम रहा है। किसी के हाथ में रोजगार नहीं, किसी के सपनों में स्थिरता नहीं… और ऊपर से राजनीति ने उसे सिर्फ भीड़ बनाकर रख दिया है। कभी धर्म के नाम पर, कभी जाति के नाम पर, तो कभी पार्टी के झंडों के पीछे। सवाल ये नहीं कि गलती किसकी है… सवाल ये है कि क्या हम सब इसके जिम्मेदार नहीं हैं? हमने नेताओं को भगवान बनाया,...

वाचकांचा अभिप्राय… आपुलकीची थाप!

लेखन म्हणजे फक्त शब्दांची मांडणी नसते… ते मनातून उमटलेल्या भावनांचं प्रतिबिंब असतं. कधी आयुष्यातल्या संघर्षाची कहाणी, कधी नात्यांमधली ओल, तर कधी समाजात घडणाऱ्या वास्तवाची जाणीव… मी प्रत्येक परिस्थितीला अनुसरून लेख लिहित गेलो, आणि नकळत माझ्या मनात साचलेल्या भावना त्या शब्दांत उतरू लागल्या. सुरुवातीला वाटायचं, हे लेख फक्त माझ्या मनापुरते मर्यादित राहतील. पण जेव्हा वाचकांनी त्या शब्दांमध्ये स्वतःचं आयुष्य पाहिलं, स्वतःच्या भावना अनुभवल्या, तेव्हा समजलं की लेखणीचं खरं सामर्थ्य काय असतं. माझ्या प्रत्येक लेखावर आलेला अभिप्राय हा केवळ प्रतिक्रिया नव्हता… ती होती आपुलकीची थाप! “तुमचा लेख मनाला भिडला…” “हे शब्द अगदी माझ्यासाठीच लिहिल्यासारखे वाटले…” असे अनेक संदेश माझ्यासाठी प्रेरणेचं इंधन बनले. कधी एखाद्या वाचकाच्या डोळ्यात पाणी आणणारा लेख, तर कधी कोणाला पुन्हा उभं राहण्याची हिंमत देणारे शब्द… हे सगळं पाहताना जाणवलं की, लेखन फक्त छंद राहिलेलं नाही, तर ते अनेक भावनांना जोडणारं माध्यम बनलं आहे. प्रत्येक अभिप्राय मी निरखून पाहिला… त्यातून चुका समजल्या, नवीन दिशा मिळाली, आणि सर्वात महत्त्वाचं म्हण...

कोकण…भूभाग नाही, श्वास आहे!

कोकण म्हटलं की मनात सर्वप्रथम उभा राहतो तो अथांग निळाशार समुद्र… नारळी-पोफळीच्या बागांमधून अलगद वाहणारा वारा… मातीतून दरवळणारा पावसाचा सुगंध… आणि कौलारू घरांच्या ओट्यावर बसलेली माणसं… कोकण म्हणजे फक्त पर्यटनस्थळ नाही… तो एक जिवंत संस्कार आहे. एक अशी जीवनशैली, जिथे माणूस निसर्गाशी भांडत नाही… तर त्याच्यासोबत जगतो. पहाटे कोंबड्याच्या आरवण्याने जाग येते, समुद्राच्या लाटांमध्ये दिवस सुरू होतो, आणि रात्री काजव्यांच्या प्रकाशात गाव शांत झोपतं… हे सगळं आजही कोकणात कुठेतरी श्वास घेतंय. पण… हा श्वास आता धाप लागल्यासारखा वाटतोय. एक काळ होता… जिथे समुद्रकिनाऱ्यावर खेकड्यांच्या रांगा दिसायच्या, झाडांवर पक्ष्यांची घरटी असायची, आणि जंगलातल्या प्रत्येक वाटेला स्वतःचा आवाज असायचा. आज त्या वाटा शांत झाल्यात… कारण विकासाच्या नावाखाली आपण निसर्गालाच गुदमरवायला सुरुवात केली. डोंगर पोखरले गेले… झाडं तोडली गेली… नद्या दूषित झाल्या… आणि समुद्रही आता आधीसारखा नितळ राहिला नाही. ज्याला आपण “जैवविविधता” म्हणतो ना… ती कोकणाची खरी ओळख होती. आंब्याच्या बागांमध्ये गुणगुणणाऱ्या मधमाशा, पावसात ओरडणारे बेडूक, रात्री चम...

परंपरेच्या विळख्यात अडकलेली "कुस "

आज तिची कुस उतावीळ झाली होती… एवढ्या दिवसांनी लेकराला कवटाळायचं होतं तिला… जणू तिच्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक ठोक्यात फक्त एकच हाक होती — “माझं लेकरू…” पण… एक क्षण… फक्त एक क्षण… कावळा शिवला म्हणे. आणि सगळं बदललं. ज्या हातांनी जन्म दिला, ज्या कुशीत त्या लेकराने पहिल्यांदा डोळे उघडले, ज्या उबेत त्याने जग ओळखलं… त्या कुशीला आज “अपवित्र” ठरवलं गेलं. ती उभी होती… डोळ्यांत अश्रू, ओठांवर थरथर… पण आवाज मात्र नाही. कारण आवाज दाबायला तिला शिकवलं गेलं होतं — “हीच परंपरा आहे…” लेकरू रडत होतं… आईच्या गंधासाठी… आईच्या स्पर्शासाठी… पण त्याला दूर नेलं गेलं. आईचं हृदय ओरडत होतं — “मला दे माझं लेकरू… कुठला कावळा? कुठली अपवित्रता? मी आई आहे… माझं प्रेम कधी अपवित्र होऊ शकतं का?” पण तिच्या प्रश्नांना उत्तर नव्हतं… फक्त शांतता होती… आणि त्या शांततेत दडलेला निर्दयी समाज. ती बघत राहिली… तिच्या हातातून निसटलेलं ते छोटंसं जग… तिच्या कुशीपासून दूर होत गेलेलं तिचं सगळं अस्तित्व… त्या क्षणी… ती फक्त आई नव्हती… ती एक वेदना झाली होती… जिला ना आवाज होता, ना न्याय. परंपरा… चालीरीती… यांना जपताना आपण इतके अंध झालोय...

बाळ… आईचं दुसरं आयुष्य

आई… हा शब्द उच्चारला की मनात एक उबदार स्पर्श जाणवतो. पण आई होणं म्हणजे फक्त एक नातं नाही—तो तिच्या आयुष्याचा एक नवा जन्म असतो. ती आधीही जगत असते… स्वप्नं बघत असते, हसत-खेळत असते, स्वतःसाठी जगत असते. पण एक दिवस… तिच्या हातात एक छोटंसं बाळ येतं, आणि त्या क्षणापासून तिचं सगळं आयुष्य बदलून जातं. बाळ म्हणजे तिचं दुसरं आयुष्य… त्या छोट्या जीवाच्या पहिल्या रडण्याबरोबर, आईचं जुनं आयुष्य शांतपणे मागे सरकतं… आणि एक नवं आयुष्य सुरू होतं—पूर्णपणे त्या बाळासाठी. रात्रभर जागणं, स्वतःची भूक विसरणं, स्वप्नं बाजूला ठेवणं… हे सगळं ती सहज करत असते. कारण तिच्यासाठी आता तिचं “मी” संपलेलं असतं… आणि “आपण” सुरू झालेलं असतं. कधी कधी ती थकतेही… कधी आरशात स्वतःकडे बघते… आणि विचार करते— “मी पूर्वीसारखी का दिसत नाही?” तिच्या डोळ्यांखालील काळी वर्तुळं, ओठांवरचं अर्धवट हसू, आणि मनातली थोडीशी हरवलेली ती… हे सगळं ती स्वतःमध्येच लपवते. कारण तिच्या हातातलं बाळ तिच्याकडे बघून हसतं… आणि त्या एका हसण्यात ती पुन्हा जगायला शिकते. आईचं प्रेम… निस्वार्थ असतं ती बाळाला चालायला शिकवते… पण स्वतःचे पाय मागे घेते. ती त्याला उंच उडा...

"अमृतवाणी"

“अमृतवाणी” — हा फक्त शब्द नाही… ही आपल्या प्रत्येकाच्या छातीत धडकणारी एक भावना आहे. आईच्या ओंजळीतून मिळालेल्या पहिल्या शब्दाची, अंगाईगीताची, आणि आयुष्यभर सोबत करणाऱ्या संस्कारांची ही ओळख आहे. मराठी… ही फक्त भाषा नाही. ही आपल्या अस्मितेची खूण आहे. ही आपल्या स्वाभिमानाची तलवार आहे. आणि ही आपल्या महाराष्ट्राच्या कर्तृत्वाची जिवंत साक्ष आहे. आपण जन्मलो तेव्हा पहिला उच्चार “आई” होता… आणि त्या “आई”मध्येच मराठी होती. तिच्या कुशीत आपण वाढलो, तिच्या शब्दांतून आपण जग समजलो. पण कधी विचार केलाय का… ही भाषा इतकी समृद्ध कशी झाली? कारण… ही भाषा फक्त बोलली गेली नाही, ती जगली गेली आहे. तीच्यासाठी अनेकांनी लढा दिला… रक्त सांडलं… स्वप्नं तुटली… पण मराठीचा झेंडा कधी खाली पडू दिला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं, ते केवळ भूमीचं नव्हतं… ते संस्कृतीचं आणि भाषेचंही स्वराज्य होतं. संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, संत नामदेव, बहिणाबाई, संत एकनाथ अशा अनेक संतांनी अभंगातून मराठीला आत्मा दिला… आणि पुढे अनेक लेखक, कवी, विचारवंतांनी तिला विचारांची उंची दिली. आपण सगळ्यांनी एक गाणं ऐकलंय… “लाभले आम्हा...

पाझर...

कधी कधी जखमा दिसत नाहीत… पण त्या सतत झिरपत राहतात. जणू काही मनाच्या भिंतीतून “पाझर” फुटलेला असतो… आईच्या जुन्या साडीत अजूनही तिचा वास आहे… त्या कपाटात हात घातला की आठवणींचा पाझर आपोआप डोळ्यात येतो. ती साडी काढताना वाटतं, जणू आई म्हणतेय – "काय रे, एवढा मोठा झालास… पण अजूनही रडतोस का?" आणि तेव्हा कळतं… मोठं होणं म्हणजे रडणं थांबवणं नाही… तर रडणं लपवणं आहे. बाबांच्या खिशात कधीच पैसे नसत… पण माझ्यासाठी त्यांनी कधी “नाही” म्हटलं नाही. आज माझ्या खिशात पैसे आहेत… पण बाबांचा हात धरायला ते नाहीत… हीच तर ती पाझरलेली वेदना आहे… जिला शब्द नसतात… पण डोळे सगळं सांगतात. एक मित्र होता… ज्याच्यासोबत सगळं शेअर करायचो… आज तो online असतो, पण आपल्यासाठी offline… त्याच्या “last seen” मध्येच आपल्या नात्याचा शेवट दिसतो… त्या चॅटमध्ये अजूनही “typing…” ची वाट पाहताना, मनाच्या आत कुठेतरी एक पाझर फुटतो… आणि ती… जिच्यासोबत आयुष्याचं स्वप्न रंगवलं होतं… ती आज कुणाच्या तरी नावाने हसतेय… आणि आपण… तिच्या आठवणींना धरून अजूनही जगतोय… किती विचित्र आहे ना… तिच्या एका “Goodbye” ने आपल्या आयुष्याचा “Pause” बटन दाब...