Posts

काकण...

गावातल्या त्या जुन्या वाड्यात अजूनही एक शांतपणा होता… पण त्या शांततेतही एक वेदना लपलेली होती. सईचं लग्न झालं होतं. हातात हिरव्या काचांच्या काकणांचा गोड खणखणाट, कपाळावर कुंकू, आणि डोळ्यांत स्वप्नांची दुनिया… आईने तिच्या हातात काकण घालताना म्हटलं होतं, “हे काकण फक्त शोभेसाठी नाहीत ग बाळा… हे तुझ्या संसाराचं सौख्य आहेत… जपून ठेव.” पहिल्या काही दिवसांत सगळं स्वप्नासारखं होतं… पण हळूहळू वास्तव समोर येऊ लागलं. नवऱ्याचा स्वभाव बदलायला लागला… शब्द कठोर झाले… आणि कधी कधी हातही उठू लागले… त्या रात्री… सई स्वयंपाकघरात उभी होती. डोळ्यांत अश्रू, पण ओठांवर शांतता… कारण तिला शिकवलं होतं – “सहन कर, संसार टिकव.” अचानक जोरात आवाज झाला… काकण फुटलं. तिच्या हातातून रक्त वाहू लागलं… पण ती वेदना तिच्या जखमेपेक्षा कमी होती. जास्त वेदना झाली ती त्या तुटलेल्या काकणांची… कारण ते फक्त काच नव्हते… तिच्या स्वप्नांचे तुकडे होते. दुसऱ्या दिवशी ती आईच्या घरी आली. आईने तिचा हात पाहिला… जखमा, ओरखडे… आणि तुटलेलं काकण… आईच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. ती काही बोलली नाही… फक्त सईचा हात हातात घेतला आणि म्हणाली— “हे काकण मी तु...

तिचा तो एक मेसेज...

"एका ‘Hi’ पासून सुरू झालेलं आयुष्य..." कधी कधी आयुष्य खूप साध्या गोष्टींनी बदलतं… ना कुठला मोठा प्लॅन, ना कुठली तयारी… फक्त एक छोटंसं "Hi"… आणि सगळं काही बदलून जातं. आम्ही दोघं… अगदी अनोळखी. नाव माहिती नव्हतं, चेहरा माहिती नव्हता… फक्त एक "Hi छान लिहितोस तू ब्लॉग्स मस्त असतात"…  तेव्हाच कळलं नव्हतं… की हा Hi एक दिवस आयुष्याचा आधार बनेल. मला लिहायची प्रचंड आवड… शब्द माझं जग होतं, भावना माझं घर. पण त्या शब्दांना अर्थ द्यायला कोणीतरी हवं होतं… आणि ती आली… एक वाचक म्हणून. ती माझे ब्लॉग वाचायची… आणि प्रत्येक वेळी काहीतरी असं लिहायची, ज्यामुळे मला वाटायचं— "कोणीतरी आहे… जो मला समजून घेतोय." हळूहळू माझं लिखाण बदलायला लागलं… शब्द अधिक खोल झाले… कारण ते फक्त कागदावर उतरलेले नव्हते, ते तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी धडपडत होते. दिवस सरत गेले… आणि आमचं बोलणंही बदलत गेलं… "Hi" वरून "Good Morning"… "Take Care" वरून "Good Night Babe" पर्यंत. पण हे सगळं इतकं सहज घडलं… की कधी तिचं अस्तित्व माझ्या आयुष्याचा भाग बनलं, हे मला कळल...

उंबरठा...

उंबरा… साधा शब्द. पण काही उंबरे असे असतात, जिथे पाय ठेवला की आयुष्य दोन भागांत विभागतं — आधीचं आणि नंतरचं. त्या दिवशी मी तिच्या घरासमोर उभा होतो. पाऊस नुकताच थांबला होता. मातीचा सुगंध हवेत भरून राहिला होता… पण माझ्या मनात मात्र काहीतरी कुजत होतं. हात उंबऱ्यावर ठेवला… आणि जाणवलं — थंडी. विचित्र थंडी. जणू घर नाही, एखादं स्मशानच. “ती आत आहे…” मन म्हणत होतं. पण दार अर्धवट उघडं होतं… आणि तरीही आतून एकही आवाज नाही. मी पाऊल टाकलं. घर अगदी तसंच होतं — भिंतींवर तिचे फोटो, कोपऱ्यात ठेवलेला तिचा आवडता दिवा… पण काहीतरी बदललं होतं. सगळं स्थिर… जणू वेळच थांबली होती. “तू आलास?” कानाजवळ आवाज आला. मी दचकून मागे वळलो. ती… ती माझ्यासमोर उभी होती. ओल्या केसांनी, पांढऱ्या साडीमध्ये… अगदी तशीच, जशी मला आठवते. पण एक फरक होता — तिच्या डोळ्यांत काहीच नव्हतं. ना प्रेम, ना राग… फक्त रिकामेपण. “तिची नजर दिसेनाशी…” हेच तर खरं होतं. मी काही बोलायचा प्रयत्न केला, पण शब्द घशातच अडकले. ती हळूच हसली… “उशीर केलास…” तिचा आवाज शांत, पण आतून कापणारा. माझ्या डोक्यात आठवणींचा स्फोट झाला — शेवटचा भांडण… तिचं रडणं… आणि माझं नि...

माणुसकी खरच हरवली का???

रात्रीचे साडेअकरा… पावसाचे थेंब छपरावर पडत होते, आणि गावातल्या जुन्या विहिरीजवळ एक माणूस धापा टाकत उभा होता… “वाचवा… कुणीतरी वाचवा…!” त्याचा आवाज काळोखात विरून जात होता. त्या माणसाच्या हातात एक छोटंसं मूल होतं. रक्ताने माखलेलं. त्याचे डोळे भीतीने मोठे झालेले… पण आवाज मात्र बंद… गावातले काही लोक धावत आले. कुणीतरी टॉर्च लावला. प्रकाश पडला… आणि एक क्षण सगळे थिजले. “कोण आहे हा…?” “आपल्या गावचा नाही वाटतो…” “कुठल्या जातीचा असेल…?” तो माणूस हात जोडून विनवणी करत होता — “माझ्या मुलाला वाचवा… कृपया… हॉस्पिटलला न्यायचंय…” पण प्रश्न बदलला — “जात कोणती आहे तुझी…?” क्षणभर काळ थांबला… त्या वडिलांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. त्याने थरथरत्या आवाजात उत्तर दिलं — “माझ्या मुलाची जात… ‘माणूस’ आहे… एवढंच माहित आहे मला…” पण तिथे उभ्या असलेल्या लोकांना ते उत्तर पुरेसं नव्हतं. कुणीतरी मागे सरकलं… कुणीतरी कुजबुजलं… “आपल्यातला नाही… हात लावू नका…” आणि त्या रात्री… पावसाचे थेंब थांबले… पण माणुसकीचं रक्त वाहत राहिलं… — दुसऱ्या दिवशी सकाळी… विहिरीजवळ शांतता होती. पण जमिनीवर सुकलेले रक्ताचे डाग… एक गोष्ट सांगत होते...

"कोऱ्या पानावर उमटलेले सावट”

:  कोऱ्या पानावर गिरवत बसलो… पण आज अक्षरं माझ्या हातून नव्हती उमटत, ती स्वतःच पडत होती… जणू काही कुणीतरी आतून लिहत होतं. शाईचा प्रत्येक थेंब थरथरत होता, कारण शब्द साधे नव्हते… ते जखमा होत्या, ज्या मी वर्षानुवर्षं लपवल्या होत्या. त्या कोऱ्या पानावर सुरुवात केली मी “मी ठीक आहे” ने… पण काही क्षणातच ओळ बदलली — “मी ठीक नव्हतो कधीच…” हात चालत होता, पण मन मागे खेचत होतं, जुन्या आठवणींच्या अंधाऱ्या कोपऱ्यात… जिथे अजूनही काही आवाज अडकलेत, कुणाचं हसू… कुणाचं रडणं… आणि माझं मौन. प्रत्येक शब्द लिहताना असं वाटत होतं, जणू मी स्वतःलाच उघडं पाडतोय… नग्न सत्यासमोर उभा आहे… जिथे खोटं लपवायला कुठलंच आच्छादन नाही. अचानक पानावर काही ओळी उमटल्या — ज्या मी लिहल्याच नव्हत्या… “तू अजूनही तिथेच अडकला आहेस, त्या एका क्षणात… जिथे सगळं संपलं होतं, आणि तू मात्र पुढे चालत राहिलास…” मी घाबरलो… कारण त्या ओळी माझ्या मनातल्या नव्हत्या, त्या माझ्या “आतल्या अंधाराच्या” होत्या… खोलीत शांतता होती, पण ती शांतता आरडाओरड करत होती… जणू भिंतींवर कुणीतरी नखांनी ओरखडे काढत होतं, आणि त्या आवाजाने माझं अस्तित्व हादरत होतं. मी पे...

“शांततेच्या पल्याड”

स्मशानाच्या शांततेत निजलो मी… जिथे शब्द संपतात, तिथूनच एक वेगळी गोष्ट सुरू होते. स्मशान… नाव ऐकताच अंगावर काटा येतो. पण त्या जागेची एक वेगळीच भाषा असते. इथे कुणी ओरडत नाही, कुणी भांडत नाही… सगळं काही इतकं शांत असतं की स्वतःचा श्वासही मोठा वाटतो. त्या शांततेत मी निजलो होतो — शरीराने नाही, पण मनाने… विचारांनी… आणि कदाचित थोडं आयुष्यानेही. त्या क्षणी जाणवलं, इथं सगळे सारखेच असतात. ना कोणी श्रीमंत, ना कोणी गरीब… ना कोणाची प्रतिष्ठा, ना कोणाचा अहंकार. जिवंतपणी ज्यासाठी आपण धावतो, झगडतो, ते सगळं इथे येऊन शून्य होतं. आणि म्हणूनच कदाचित ही शांतता इतकी खरी वाटते. माझ्या आजूबाजूला राख उडत होती… जणू काही आयुष्याच्या आठवणी हवेत विरघळत होत्या. प्रत्येक राखेच्या कणात एक कथा होती, एक नातं होतं, एक अपूर्ण स्वप्न होतं. आणि त्या सगळ्या कथा एकाच गोष्टीकडे बोट दाखवत होत्या — “शेवट सगळ्यांचा एकच असतो.” त्या शांततेत पडून राहिल्यावर, मनातले सगळे गोंधळ हळूहळू शांत होत गेले. जे प्रश्न खूप मोठे वाटत होते, ते इथे अगदी छोटे वाटू लागले. “कोण बरोबर, कोण चूक?” “कोण जिंकला, कोण हरला?” हे सगळं इथे येऊन अर्थहीन वाटू ला...

भाळीचं कुंकू… की रक्ताची सावली?

ती रोज सकाळी उठायची… आरशासमोर उभी राहायची… आणि अगदी अलगद… भाळी कुंकवाचा मळवट भरायची… पण गावात सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळलेल्या असायच्या… कारण — ती विधवा होती. “अगं, विधवा असूनही कुंकू लावते?” “काय गरज आहे या नाटकाची?” “काहीतरी गडबड आहे…” अशा कुजबुजीत तिचं आयुष्य गुंतलं होतं… पण ती मात्र शांत… निर्विकार… जणू काही काहीतरी जपते आहे… किंवा लपवते आहे… तिचं नाव होतं राधा. तीन वर्षांपूर्वी तिचा नवरा अनिकेत अचानक मेला… कसं मेला? कोणीच ठाम सांगू शकत नव्हतं… कोणी म्हणाले – अपघात… कोणी म्हणाले – आत्महत्या… आणि काहींच्या डोळ्यात तर एक वेगळीच भीती होती… त्या दिवशी… अनिकेतचं शव घरात आणलं तेव्हा, राधाने एकही अश्रू ढाळला नव्हता… फक्त शांतपणे त्याच्या कपाळावर हात फिरवला… आणि हळूच कुजबुजली… “मी थांबतेय… अजूनही…” गावातल्या लोकांना तेव्हा वाटलं — दुःखात बाई सुन्न झालीय… पण त्या दिवसापासून… ती रोज कुंकू लावायला लागली. एके रात्री… शेजारीण ताईने पाहिलं… राधा आरशासमोर उभी होती… पण तिच्या मागे… आरशात आणखी एक सावली दिसत होती… पुरुषाची. ताई घाबरून मागे सरकली… पुन्हा पाहिलं तर — राधा एकटीच होती. दुसऱ्या दिवशी,...