वाचकांचा अभिप्राय… आपुलकीची थाप!
लेखन म्हणजे फक्त शब्दांची मांडणी नसते… ते मनातून उमटलेल्या भावनांचं प्रतिबिंब असतं. कधी आयुष्यातल्या संघर्षाची कहाणी, कधी नात्यांमधली ओल, तर कधी समाजात घडणाऱ्या वास्तवाची जाणीव… मी प्रत्येक परिस्थितीला अनुसरून लेख लिहित गेलो, आणि नकळत माझ्या मनात साचलेल्या भावना त्या शब्दांत उतरू लागल्या. सुरुवातीला वाटायचं, हे लेख फक्त माझ्या मनापुरते मर्यादित राहतील. पण जेव्हा वाचकांनी त्या शब्दांमध्ये स्वतःचं आयुष्य पाहिलं, स्वतःच्या भावना अनुभवल्या, तेव्हा समजलं की लेखणीचं खरं सामर्थ्य काय असतं. माझ्या प्रत्येक लेखावर आलेला अभिप्राय हा केवळ प्रतिक्रिया नव्हता… ती होती आपुलकीची थाप! “तुमचा लेख मनाला भिडला…” “हे शब्द अगदी माझ्यासाठीच लिहिल्यासारखे वाटले…” असे अनेक संदेश माझ्यासाठी प्रेरणेचं इंधन बनले. कधी एखाद्या वाचकाच्या डोळ्यात पाणी आणणारा लेख, तर कधी कोणाला पुन्हा उभं राहण्याची हिंमत देणारे शब्द… हे सगळं पाहताना जाणवलं की, लेखन फक्त छंद राहिलेलं नाही, तर ते अनेक भावनांना जोडणारं माध्यम बनलं आहे. प्रत्येक अभिप्राय मी निरखून पाहिला… त्यातून चुका समजल्या, नवीन दिशा मिळाली, आणि सर्वात महत्त्वाचं म्हण...