Posts

“कुंपणावरची सावली”

Image
आज त्या म्हातारीला पाहिलं, अडखळत-अडखळत कुंपणाशी आली… थकलेलं शरीर, थरथरणारे हात, काहीतरी शोधत होती—तिचंच घर की तिचंच साथ? भरल्या डोळ्यांनी पुन्हा मागं फिरली, जणू भूतकाळानेच तिला हाक मारली; क्षणभर थांबली, नजर चुकवली, आणि स्वतःशीच पुटपुटत ओढ दाबत चालू लागली. वृद्धाश्रमाच्या त्या दाराशी— किती कहाण्या अडकलेल्या असतात, आईच्या कुशीत वाढलेले सारे, आता तिला ओझं म्हणतात. तिच्या पावलात वेदना होती, तिच्या श्वासात हंबरडा; कुंपणावर विसावलेली ती सावली जणू विचारत होती— "चूक माझी होती का, की काळाचा खेळच खोडकर झाला?" आज त्या म्हातारीची चाल हलली, पण मन तिचं ढासळलं होतं; जगलेल्या आयुष्याच्या आठवणींनी तिचं खरं घर अजूनही तिथेच होतं… वृद्धाश्रमाच्या दाराशी ती पुन्हा उभी, पण मन मात्र जुन्या घराच्या अंगणात, तेच तिने पुटपुटत सांगितलं— “जगानं ठरवलं तरी… मी अजूनही त्यांचीच आई आहे.”

तीन चाकांची कहाणी...

Image
रिमझिम सरींत भिजतो रस्ता, पावसाच्या थेंबांची चाल कथा। रिकाम्या नजरेतून बघतो मी, रिक्शात बसून आयुष्याची वाटचाल ती। डावीकडे पाट्या, उजवीकडे झाडं, सर्व काही धूसर, स्वप्नांसारखं वाऱ्यात गाडं। रिक्शावाला गतीने पुढं सरतो, पाठीवर काळजीचं ओझं वसंतासारखं धरतो। समोरची काच धुक्याने भरली, मनातली आठवण हळूच सरली। वाऱ्याच्या गाण्यात हरवली दिशा, शहराची धावपळ, आणि अंतर्मनाची चिंता। तीन चक्रांची ही छोटी दुनिया, सांभाळते मनातली वेदना जुना। एक क्षणासाठी विसरतो जग, जेव्हा पावसात रिक्शात बसतो मग।

"आख़िर हम कहानी बन जाते हैं..."

कभी किसी की यादों में, तो कभी किसी की बातों में, कभी अधूरी ख्वाहिशों के पन्नों पर, तो कभी किसी की अधजली डायरी में। हम जीते हैं, टूटते हैं, कभी सहेजते हैं तो कभी बिखरते हैं, पर वक्त की धूल जब उन पलों पर जमती है — तो वो लम्हे… कहानी बन जाते हैं। जिसे कोई सुनाता है मुस्कुराकर, तो कोई सुनता है आंखें भिगोकर। हम रिश्तों के किस्से होते हैं, हम जज़्बातों के अफ़साने बनते हैं, हम वो आवाज़ होते हैं, जो कभी बोली नहीं जाती — बस दिल में कहीं रह जाती है। क्योंकि आख़िर में, हम इंसान नहीं, किसी के लिए याद, किसी के लिए सीख, और किसी के लिए बस एक कहानी बन जाते हैं। ?

मी का आलो, कशासाठी आलो?

Image
मी का आलो, कशासाठी आलो, हा प्रश्न मनात रोज घुमतो, जगाच्या गर्दीत चालतो आहे, पण आपलाच चेहरा हरवतो. कधी वाटतं, नियतीनं लिहिलं, पानावर माझं नाव विसरलं, हसणाऱ्या चेहऱ्यांमध्ये मी, माझं दुःख एकटंच हसवत गेलो. स्वप्नं होती, पण धूसरशी, आकाश नव्हतं माझ्या ओंजळीत, पावलांखाली वाळू सरकली, हातात मात्र रिकामी रेघ ओढली. कोणी म्हणालं— "प्रयोजन शोध", कोणी म्हणालं— "दिशा ठरव", पण माझी दिशा ही शांत होती, आणि माझं प्रयोजन – नंतरचं होतं. आजही मी चालतो, पण उत्तर शोधत नाही, कारण कधीकधी अस्तित्वच एक प्रश्न असतो — उत्तर नसलेला... पण जगण्यासारखा.

असावं कुणीतरी....

सहज तिने विचारलं काय रे एकटाच का बसला आहेस??? मी म्हणालो....., असावं कुणीतरी...आपल्याला समजून घेणारं.. असावं कोणीतरी... आपण चुकल्यावर आपल्याला समजावून सांगणारं असावं कोणीतरी... आपण अडखळल्यावर आपल्याला सावरणारं असावं कोणीतरी... आपल्याला आपलसं वाटणारं.... त्यावर ती म्हणते कशी... आहे ना मी का तू एकटा बसतोयस? मी असताना सुद्धा एकटा का सोसतोयस? सांगितलं होता तुला कधी ही आवाज दे मला बोल ना तू माझ्याशी, कशाला शोधतोयस ह्याला त्याला.... मी दुख:त असले कि चेहरा तुझा पडतो तुझा त्रासलेला आवाज मलासुद्धा कळतो...

ती आणि....

Image
तिचं माझ्याशी रोज बोलणं...काही दिवस मात्र आम्ही दोघं ही गप्पच होतो...कारण माहित नाही...कदाचित ती तिच्या कामात आणि मी माझ्या कामात व्यस्त होतो...सहज आज बोलणं झालं, एका meme वरून आमचा संवाद सुरू झाला...माझं मध्येच तिच्याशी न बोलणं तिला खटकत असायचं...कारण रोजची सवय अचानक तुटावी आणि संपूर्ण रंगलेली मैत्री क्षणात विस्कटावी...आमची मैत्री इतकी घट्ट की माझ्या चुकांवरून पांघरून घालून माझी समजूत घालून तिनेच मला मिठी मारावी... तिला माझ्याकडून कसली ही अपेक्षा नाही,तिला फक्त गरज आहे ती माझ्या सहवासाची,आपुलकीची आणि प्रेमाच्या चार शब्दांची...नशीब लागतं अशी मैत्रीण मिळायला जिच्या सहवासात संपूर्ण आयुष्य मिळतंय जगायला.... चेहऱ्याच्या हाव भावतून मनातले भाव ओळखून "काय झालं सगळं ठीक आहे ना?" असं हक्काने विचारणारी ती...आज मात्र तिच्या मनातले भाव न ओळखू पाहणारा मी...तिच्या ही मनाला वाटत असेल कुठे तरी आपल्या मनातलं कोणीतरी ओळखावं कधीतरी....नकळत येणाऱ्या अश्रूंना रोखून धरावे कुणीतरी....तिला ही वाटतं मिश्किल हसणं पुन्हा खुलू दे तिच्या गालावरी...तीच जाणते जखमा झालेल्या तिच्या हृदयावरी.... कर्तव्याची ओझ...

श्रीमानयोगी.... वाचनातला माझा न थांबणारा प्रवास...

Image
श्रीमान योगी.... नावातच आदर दिसतो...आणि आदर का नसावा...श्रीमान योगी -  आदर्श राज्यकर्ता, थोर सेनानी, प्रजादक्ष, धर्माभिमानी, परधर्मसहिष्णू, चारित्र्यसंपन्न, दूरदृष्टीचा असा जाणता राजा जगाच्या इतिहासात दुसरा मिळणे कठीण . पुरंधरच्या तहाने धुळीला मिळालेले राज्य त्याच धुळीतून परत उठवून सुवर्णमय करण्याचे सामर्थ्य फक्त या एकाच महापुरुषात होते तो महापुरुष म्हणजे स्वराज्य जनक छत्रपती शिवाजी महाराज... सध्याची पिढी मोबाईल मध्ये गुंतली आहे...मी पण असाच मोबाईल मध्ये गुंतून असतो...सहजच घरातल्या एका ड्रॉवर मध्ये मला हे पुस्तक दिसलं, बरेच दिवस वाचायची इच्छा होती पण या मोबाईलच्या जाळ्यातून वेळ कुठे मिळतो...आज मात्र वेळ काढलाच आणि श्रीमान योगी हाती घेतलं...पहिलीच ओळ नजरेस पडली.... निश्र्चयाचा महामेरू| बहुत जनांसी आधारु अखंड स्थितीचा निर्धारु | श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांचे रूप आपल्याला थक्क व्हायला लावते, इतका अष्टपैलू, अष्टावधानी,आदर्श राज्यकर्ता थोर सेनानी, प्रजादक्ष, धर्माभिमानी,परमधर्मसहिष्णू, चारित्र्यसंपन्न, दूरदृष्टी असणारा जाणता राजा जगाच्या इतिहासात दुसरा सापडणे अशक्य ...