परंपरेच्या विळख्यात अडकलेली "कुस "
आज तिची कुस उतावीळ झाली होती… एवढ्या दिवसांनी लेकराला कवटाळायचं होतं तिला… जणू तिच्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक ठोक्यात फक्त एकच हाक होती — “माझं लेकरू…” पण… एक क्षण… फक्त एक क्षण… कावळा शिवला म्हणे. आणि सगळं बदललं. ज्या हातांनी जन्म दिला, ज्या कुशीत त्या लेकराने पहिल्यांदा डोळे उघडले, ज्या उबेत त्याने जग ओळखलं… त्या कुशीला आज “अपवित्र” ठरवलं गेलं. ती उभी होती… डोळ्यांत अश्रू, ओठांवर थरथर… पण आवाज मात्र नाही. कारण आवाज दाबायला तिला शिकवलं गेलं होतं — “हीच परंपरा आहे…” लेकरू रडत होतं… आईच्या गंधासाठी… आईच्या स्पर्शासाठी… पण त्याला दूर नेलं गेलं. आईचं हृदय ओरडत होतं — “मला दे माझं लेकरू… कुठला कावळा? कुठली अपवित्रता? मी आई आहे… माझं प्रेम कधी अपवित्र होऊ शकतं का?” पण तिच्या प्रश्नांना उत्तर नव्हतं… फक्त शांतता होती… आणि त्या शांततेत दडलेला निर्दयी समाज. ती बघत राहिली… तिच्या हातातून निसटलेलं ते छोटंसं जग… तिच्या कुशीपासून दूर होत गेलेलं तिचं सगळं अस्तित्व… त्या क्षणी… ती फक्त आई नव्हती… ती एक वेदना झाली होती… जिला ना आवाज होता, ना न्याय. परंपरा… चालीरीती… यांना जपताना आपण इतके अंध झालोय...