Posts

चाय वाली लव्हस्टोरी...

Image
तिची आणि माझी फारशी ओळख नव्हती, कधीतरी मित्रांसोबत जायचो. बऱ्याचदा तिला भेटण्यासाठी मी टाळाटाळ करायचो...  एकदा एकतांत तिची आणि माझी भेट झाली... तिच्या सहवासात राहून मन मोकळं केलं,आणि तेव्हापासून मला तिच्या सहवासाची सवयच झाली...  आता एक दिवस असा नाही की मी तिला भेटलो नाही ... कारण तिच्याशिवाय आता मला करमतही नाही...  दिवस मावळतीला गेला की ओढ लागायची दुसऱ्या दिवसाची ,  कारण कधी कुठे केव्हाही भेट आमची व्हायची तिला भेटण्यासाठी मी कारणांची पुरवणी लावायचो, अनेकदा तर बॉस च्या शिव्या देखील खायचो, कित्येकदा तर आधी तिची भेट आणि मगच ऑफिस ला जायचो...  पण या लॉकडाउन मुळे आमचं भेटणं रखडलं, कोणी कुठे वटवाघूळ खाल्लं आमच्या भेटीत विघ्न म्हणून लॉकडाउन आडवं आलं... रोज तिला भेटण्यासाठी मी बाहेर पडतो, बॅरिगेट्स पाहून मी पुन्हा ऑफिसचीच वाट धरतो...  माझी लव्हस्टोरी सांगण्याच्या नादात तिची ओळख सांगायचं राहून गेलं... चहा तिचं नाव हे सांगायचंच राहून गेलं..

“कुंपणावरची सावली”

Image
आज त्या म्हातारीला पाहिलं, अडखळत-अडखळत कुंपणाशी आली… थकलेलं शरीर, थरथरणारे हात, काहीतरी शोधत होती—तिचंच घर की तिचंच साथ? भरल्या डोळ्यांनी पुन्हा मागं फिरली, जणू भूतकाळानेच तिला हाक मारली; क्षणभर थांबली, नजर चुकवली, आणि स्वतःशीच पुटपुटत ओढ दाबत चालू लागली. वृद्धाश्रमाच्या त्या दाराशी— किती कहाण्या अडकलेल्या असतात, आईच्या कुशीत वाढलेले सारे, आता तिला ओझं म्हणतात. तिच्या पावलात वेदना होती, तिच्या श्वासात हंबरडा; कुंपणावर विसावलेली ती सावली जणू विचारत होती— "चूक माझी होती का, की काळाचा खेळच खोडकर झाला?" आज त्या म्हातारीची चाल हलली, पण मन तिचं ढासळलं होतं; जगलेल्या आयुष्याच्या आठवणींनी तिचं खरं घर अजूनही तिथेच होतं… वृद्धाश्रमाच्या दाराशी ती पुन्हा उभी, पण मन मात्र जुन्या घराच्या अंगणात, तेच तिने पुटपुटत सांगितलं— “जगानं ठरवलं तरी… मी अजूनही त्यांचीच आई आहे.”

“मन भरत नाही तिच्यावर…”

कधी कधी एखादी मुलगी आपल्या आयुष्यात अशी येते, की तिचं अस्तित्वच सगळं काही बनून जातं. तिच्याकडे पाहिलं की वेळ थांबावी असं वाटतं… आणि नजरा हटतच नाहीत. मन भरून तिला बघायचंय, पण तिला बघून मन भरतच नाही—ही भावना शब्दांत मांडणं सोपं नाही, ती जगावी लागते. ती दिसते तेव्हा, तिच्या चेहऱ्यावरचं हसू, तिच्या डोळ्यांमधली निरागसता… सगळंच काहीतरी खास वाटतं. जणू काही तिच्याकडे बघताना मी स्वतःलाच शोधतोय. प्रत्येक क्षणात ती अधिकच आपलीशी वाटते. आणि म्हणूनच कदाचित, कितीही वेळ तिच्याकडे पाहिलं तरी मन कधीच “भरलं” असं वाटत नाही. माझ्या डोळ्यांत तिला साठवून ठेवावं असं वाटतं… जणू ती नजरेतून कधीच दूर जाऊ नये. पण खरं सांगायचं तर, कितीही तिला जपलं, तरी आत कुठेतरी एक हळवी पोकळी राहतेच. कदाचित ती तिच्याविषयीची ओढ असते… किंवा तिच्याशी अजून थोडं जवळचं नातं हवंय अशी मनाची इच्छा. ही भावना प्रेम आहे का, की फक्त आकर्षण—हे अजून ठरलेलं नाही. पण एवढं नक्की, की तिचं अस्तित्व माझ्या जगण्याचा एक सुंदर भाग बनलंय. तिच्याकडे पाहताना, मनाला एक वेगळीच शांतता मिळते… आणि त्याचवेळी एक गोड बेचैनीही. कधी कधी वाटतं, तिने माझ्याकडे एकदा तरी...

तीन चाकांची कहाणी...

Image
रिमझिम सरींत भिजतो रस्ता, पावसाच्या थेंबांची चाल कथा। रिकाम्या नजरेतून बघतो मी, रिक्शात बसून आयुष्याची वाटचाल ती। डावीकडे पाट्या, उजवीकडे झाडं, सर्व काही धूसर, स्वप्नांसारखं वाऱ्यात गाडं। रिक्शावाला गतीने पुढं सरतो, पाठीवर काळजीचं ओझं वसंतासारखं धरतो। समोरची काच धुक्याने भरली, मनातली आठवण हळूच सरली। वाऱ्याच्या गाण्यात हरवली दिशा, शहराची धावपळ, आणि अंतर्मनाची चिंता। तीन चक्रांची ही छोटी दुनिया, सांभाळते मनातली वेदना जुना। एक क्षणासाठी विसरतो जग, जेव्हा पावसात रिक्शात बसतो मग।

"आख़िर हम कहानी बन जाते हैं..."

कभी किसी की यादों में, तो कभी किसी की बातों में, कभी अधूरी ख्वाहिशों के पन्नों पर, तो कभी किसी की अधजली डायरी में। हम जीते हैं, टूटते हैं, कभी सहेजते हैं तो कभी बिखरते हैं, पर वक्त की धूल जब उन पलों पर जमती है — तो वो लम्हे… कहानी बन जाते हैं। जिसे कोई सुनाता है मुस्कुराकर, तो कोई सुनता है आंखें भिगोकर। हम रिश्तों के किस्से होते हैं, हम जज़्बातों के अफ़साने बनते हैं, हम वो आवाज़ होते हैं, जो कभी बोली नहीं जाती — बस दिल में कहीं रह जाती है। क्योंकि आख़िर में, हम इंसान नहीं, किसी के लिए याद, किसी के लिए सीख, और किसी के लिए बस एक कहानी बन जाते हैं। ?

मी का आलो, कशासाठी आलो?

Image
मी का आलो, कशासाठी आलो, हा प्रश्न मनात रोज घुमतो, जगाच्या गर्दीत चालतो आहे, पण आपलाच चेहरा हरवतो. कधी वाटतं, नियतीनं लिहिलं, पानावर माझं नाव विसरलं, हसणाऱ्या चेहऱ्यांमध्ये मी, माझं दुःख एकटंच हसवत गेलो. स्वप्नं होती, पण धूसरशी, आकाश नव्हतं माझ्या ओंजळीत, पावलांखाली वाळू सरकली, हातात मात्र रिकामी रेघ ओढली. कोणी म्हणालं— "प्रयोजन शोध", कोणी म्हणालं— "दिशा ठरव", पण माझी दिशा ही शांत होती, आणि माझं प्रयोजन – नंतरचं होतं. आजही मी चालतो, पण उत्तर शोधत नाही, कारण कधीकधी अस्तित्वच एक प्रश्न असतो — उत्तर नसलेला... पण जगण्यासारखा.

असावं कुणीतरी....

सहज तिने विचारलं काय रे एकटाच का बसला आहेस??? मी म्हणालो....., असावं कुणीतरी...आपल्याला समजून घेणारं.. असावं कोणीतरी... आपण चुकल्यावर आपल्याला समजावून सांगणारं असावं कोणीतरी... आपण अडखळल्यावर आपल्याला सावरणारं असावं कोणीतरी... आपल्याला आपलसं वाटणारं.... त्यावर ती म्हणते कशी... आहे ना मी का तू एकटा बसतोयस? मी असताना सुद्धा एकटा का सोसतोयस? सांगितलं होता तुला कधी ही आवाज दे मला बोल ना तू माझ्याशी, कशाला शोधतोयस ह्याला त्याला.... मी दुख:त असले कि चेहरा तुझा पडतो तुझा त्रासलेला आवाज मलासुद्धा कळतो...