Posts

Showing posts from April, 2021

नवसंजीवनी...

Image
हनुमान  ऊर्फ  मारुती  ही रामायणातील एक लोकप्रिय व्यक्तिरेखा असून तो श्री रामाचा महान भक्त, दास, दूत मानला जातो. त्याचा जन्म अंजनी या वानरीच्या पोटी अंजनेरी येथे झाला होता. मारुतीच्या अनेक शौर्य गाथा अजूनही आजही अनेकांच्या मनात कोरल्या गेल्यात...ज्यावेळी रावणाने सीतेचं अपहरण केलं आणि लंकेला घेऊन गेला त्यावेळेस सीतेला परत आणण्यासाठी वानरसेना सज्ज झाली..सीतेला परत आणण्यासाठी अनेक आव्हानं रामासमोर उभी ठाकलेली... सर्व आव्हानांना सामोरं जाण्यासाठी रामसोबत खंबीर पणे उभा होता तो हनुमान... ज्यावेळी रावण आणि राम यांच्यात युद्ध घडलं त्यावेळी लक्ष्मणाला बाण लागला आणि तो बेशुद्ध पडला , सर्व देव ऋषीमुनी एकजूट झाले परंतु कोणालाच लक्ष्मणाला शुद्धीवर आणता आलं नाही...सर्व देव तिथे उपस्थितीत असूनही एकाही देवाला लक्ष्मणाला शुद्धीवर आणणं जमलं नाही..तेव्हड्यात एक ऋषी उठले आणि त्यांनी उत्तरेच्या बाजूला द्रोणागिरी पर्वत आहे त्यावर मिळणारी संजीवनी हीच लक्ष्मणाला वाचवू शकते असं सांगितलं हनुमानाने कुठलाही विचार न करता लगेच उत्तराखंडातील द्रोणागिरी पर्वताकडे झेप घॆतली. पर्वतावर त्या ला हवी ती वनस्पती ओळखू न आल्

खेळ प्रश्न उत्तरांचा...

खेळ प्रश्न उत्तरांचा नाती गोती दूर लोटली गेली स्वार्थापायी आपलीच माणसं दूर गेली कधी आपलं,आपण ,आमचं म्हणणारे आज माझं म्हणायला लागले विसर पडला त्यांना जे अडचणीत त्यांच्या सोबत आले विसरून ते दिवस आपला स्वार्थ पाहू लागले काय सांगावं त्यांना जे माणुसकीच हरवून बसले  आदळणाऱ्या लाटांचा स्पर्श जेव्हा किनाऱ्याला होतो,त्या किनाऱ्याच्या वेदना पाहून समुद्र पण ओहटीची भूमिका घेतो  हल्ली माणसाला माणूस म्हणून कोण नाही पहात त्याची फक्त पाहिली जाते जात Sign of true love म्हणून ताजमहल ला पाहिलं जातं Sign of friendship म्हणून राधा कृष्णाचं नातं का लपवलं जातं?  समोरच्याच्या भावना आपण दुखवतो त्याच्या डोळ्यातले अश्रू पुसायला आपण कधी जातो? समोरच्याच्या चुकीवर आपण त्याला तत्वज्ञान शिकवतो आपली चूक आपण कधी मान्य करतो?  आपल्याला गरज असते तेव्हा समोरच्याला आपण मस्का मारतो समोरच्याला गरज भासते तेव्हा आपण त्याला फाट्यावर मारतो....