Posts

Showing posts from October, 2020

माणसातला देव...

पत्र:-                डाॅक्टर्स, नाही कसयं ना, या साऱ्या मोठ्या कोरोना नावाच्या आजारात अविरत दिनरात तुम्ही आमच्यासाठी राबताय ,आणि आम्ही नागरिक गेल्या काही दिवसांमधे बेजबाबदारपणे वागलोयं हो. पण तरी आमच्यातले जे चुकलेत त्यांना तुम्ही सावरलंय. केवळ आज डाॅक्टर्सच नाही तर सर्वजण किती मेहनतीने लढतायं. ती इटलीतली आर्मी जिवाची पर्वा न करता त्या मेलेल्या प्रेतांच्या विल्हेवाट लावण्यासाठी किती मोठी रिस्क घेतीये. आर्मी, पोलीस, स्वच्छता कर्मचारी तुम्ही अगदी किती मोठ्या प्रमाणात तुमचं आयुष्य इतर इतक्या साऱ्या लोकांसाठी पणाला लावतायं, तुम्ही अगदी देवाच्या रूपात आलात अगदी सर्वचजण . तुम्ही ना कधी तुमच्या कुटुंबाची पर्वा केलीत ना इतर गोष्टी पाहिल्यात, तुम्ही ज्या हिमतीने लढतायं ना ती हिम्मत खरच दाद देण्यासारखी आहे राव. सध्या कुठला देश आणि कुठले लोकं,कुठलीच जात धर्म बघून काहीच होणारं नाही या आजाराने अगदी चपराक मारली . सर्व हे छोट्याछोट्या गोष्टींवर भांडत राहणाऱ्या देशातील असंख्य जनतेवर आणि यातच डाॅक्टर्सनी त्यांची भुमिका अगदी चोख बजावली लोकांसाठी, आणि ते बजावतायेत. सर्वचजण अगदी देव बनून तिथे केवळ आमच्या

तुका कोणाला पटला?????

ना त्यावेळी कोणाला संतवाणी पटली....तुकारामाची कहाणीच खडतर अजूनही कोणाला कळली नाही...गाथा तुकोबारायांच्या इंद्रायणीत बुडविल्या...इंद्रायणीच्या उदरातून पुन्हा वर आल्या...कथा तुकोबारायांची युगे युगे आठविल्या...ते होते संत तुकोबा अंबाईल...कथा सारखीच या तुकोबाची मात्र कहाणी वेगळी...एका तुकारामास होती पंढरीची आस तर दुसरा कायद्याच्या भोगतोय त्रास...ही कहाणी आहे पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची...15 वर्षांची कारकीर्द 14 वेळा बदल्या...एक अनोखा अनुभव त्यांच्या नशिबी...माणसाने आपल्या कर्तव्यात किती निष्ठावंत असावं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आयुक्त तुकाराम मुंढे..आपल्या कामाने असंख्य लोकांच्या मनात स्थान तर अनेकांच्या वाईट कामात असणारा अडथळा अशी ओळख असणारे तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली...मनात एकच प्रश्न घोंगवतोय माणसाने कर्तव्यनिष्ठ असू नये का?

कोन म्हणतया....

कोन म्हणतया मला काय जमत नाही,, आयुष्याचा नागमोड्या वळणावर भावनांना डांबून ठीवनं जमलंय मला..... मोकळा श्वास घेणं आता हळू हळू शिकतोय दावणीला बांधाया.. इथं नाही कोणाला पर्वा कुणाची....समद्याना काम हवं फकास्त मंग व्हत्यात मोकळी काम झाल्यावर निघून जायला... मी बी आता मोजून मोजून जगू लागलो.... हसन्या आधी माझं हसू मोलून मापून बघू लागलो..... भावनांचा सुर जवा गवसत न्हाय कुठं तवा मात्र,,,पेन आन कागुद असतो सोबतीला.... भावनांचा गाठोडा हळू हळू उत्रू लागतो कोऱ्या कागुदावर...लिहून झालेलं गाठोड मात्र अजून जमलं न्हाय घडी घालून ठेवाया..... आयुष्याची गाठोडी बांधता बांधता...स्वप्नाची घडी मात्र इस्कटली....आठवणींची जमा पुंजी सोबत राहिली...माणुसकीची नाव मात्र भरकटली....

वरुणराजा का इतका कठोर झालाय

हे वरुणराजा इतका का कठोर झालाय रे....तुझ्या एका सरीची वाट पाहणारा आज मात्र तुझा तिरस्कार करतोय.....वर्षभराची मेहनत क्षणात कुसवतोयस...कापणी ला आलेलं पीक असच सडतय...तू बरसत नाही तू तर कोसळतोय.... ज्यांचं छत्र कौल आहे त्यांचं काही नाही....पण ज्यांचं छत्र आभाळ आहे त्यांचं काय....इतका कठोर नको होऊ रे...आधीच त्या कोरोनाने हतबल झालोय सारे त्यात तू असा बरसतोय....जगाचा पोशिंदा तुझ्यावर अवलंबून आहे रे...तू बरासलास तर सारं वर्ष सरतय...पण आता शेत पिकात पाणी साठलय...काय करावं आता तूच सांग...तुझ्या शब्दाला जागून वर्षभर मेहनत करायची आणि क्षणात येऊन त्याची तू अशी दिंडी काढायची.....? आभाळ सारं फाटलं ... शीवू कुठे आणि कस....?म्हणूनच का गावाकडचा माणूस शहराकडे वळला...तुझ्या ह्या भीती पोटी... सारं संसार विकून बसला....वर्षानुवर्ष जपलेली शेतजमीन एका क्षणात देऊन बसला.....तरी देखील शेतकरी आमचा हरला नाही...सवय झाली त्याला या सगळ्याची....आणि न हरण्याची....कर्ज काढून पीक उगवलं ...पंचनामे दूर साधी पाहणी भी नाय झाली....काय करावं त्याने ज्याच्या पोराचं शिक्षण सारं शेतीवर आहे....अरे का नाही लावणार फास गळ्याला .....ओस