Posts

Showing posts from November, 2020

सहा तासांचा सोबती...

Image
एकदा मुंबईहून गावी येत होतो...गावी येण्याची ओढ ही मला लहानपणापासूनच होती...शिवशाही बस ने मी मुंबईहून निघालो,प्रवास माझा एकट्यालाच करायचा होता पण नशिबी एक साथीदार देऊन गेला...दादर ला माझं boarding झालं , मी मोबाइल काढला आणि गाणी ऐकत माझा प्रवास सुरु केला....प्रवासात मला गाणी ऐकण्याची सवयच आहे...माझ्या बाजूची सीट रिकामी होती आणि मला नव्हतं माहीत की ती रिसर्व्ह आहे ...म्हणून मी माझी बॅग बाजूच्या सीट वर ठेवली आणि डोळे मिटून गाणी ऐकत होतो...पनवेल आलं आणि मला एका आजींनी खुनावलं..मी ताडकन जागा झालो आणि काय झालं विचारलं ...तेवढ्यात त्या आजी स्मितहास्य करून म्हणल्या "बाबू ही सीट माझी आहे , बॅग उचलतोस का?" मी पण हसूनच उत्तर दिलं "अहो बसा ना तुमचीच आहे सीट"...साधारण पाहिलं तर त्या आजींचं वय 70 ते 75 असेल...मी पुन्हा गाणी ऐकण्यात गुंग झालो....    थोड्यावेळाने माझी नजर सहज त्या आजींकडे गेली त्या एकटक माझ्याकडे पाहत होत्या..."काय झालं आजी असं का पाहताय काही हवं का?" मी विचारलं..."काही नाही , तुला पाहून माझ्या नात्वाची आठवण आली,5 वर्ष झाली पाहिलं नाही त्

सवय

एखाद्याची आपल्याला एवढी सवय होऊन बसते त्यावेळी आपल्याला सतत त्या व्यक्तीचा भास होत असतो...वेळोवेळी ती व्यक्ती आपल्यासोबत असावी असं वाटत असतं... नेहमीच ते शक्य नसतं....त्या व्यक्तीचा हवा असणारा सहवास ज्यावेळी मिळत नाही ना त्यावेळी होणारी घुसमट बेचेन करून सोडते...एखाद्या व्यक्तीची वाट पाहणं चुकीचं असतं का? नाही म्हणजे आपण ज्या व्यक्तीसाठी घुटमळत असतो तीच व्यक्ती आपल्यापासून दूर जातेय हे पाहून मन अस्थिर होतं नाही का?...  आपल्याला त्या व्यक्तीच्या सहवासाची सवय झालेली असते...पण अचानक ती सवय तुटते त्यावेळी आपण पूर्णतः खचून जातो...तरी देखील आपण समोरच्या व्यक्तीचाच विचार करत असतो...पण ती व्यक्ती आपला विचार करत असेल का हा प्रश्न आपण स्वतःला विचारतो का....? नाही विचारत कारण आपल्याला समोरच्याचे मन कसं मारायचं हा प्रश्न पडतो ...त्याला काय वाटेल तो काय विचार करेल आशा अनेक प्रश्नांच्या गुंत्यात आपण अडकून जातो....आणि नंतर मग त्यातून बाहेर पडणे अवघड होऊन बसतं...   मग अश्या परिस्थितीत आपण करायचं तरी काय...हातावर हात ठेवून शांत बसायचं का? अनेक प्रश्न आ वासून समोर उभे आहेत...त्यांची उत्तरं मात्र नाहीत...

का कुणास ठाऊक

का कुणास ठाऊक....असा प्रश्न अनेकदा लोकांना पडत असतो यात तथ्य एवढंच की त्याचं उत्तर आपल्याकडे कधीच नसतं...एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात सहज घडून जाते....त्याचा आपण गांभीर्याने कधीच विचार करत नाही...समोरच्या व्यक्तीने आपल्याला विचारला की का असं घडलं त्यावर आपण सहज म्हणून जातो का कुणास ठाऊक ...मग आपल्याला ठाऊक तरी काय हा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारायला हवा ना...जो पर्यंत आपल्याच प्रश्नाचं उत्तर आपण शोधत नाही तो पर्यंत आपल्याला त्याचं उत्तर मिळणारच नाही ना..   आपण आपल्या आयुश्यात प्रश्नांच्या मागे धावतो पण कधी त्यांच्या उत्तराचा पाठलाग करतो का ,तर नाही करत जो की आपल्याला करणं गरजेचं आहे...आयुष्याच्या वळणावर अनेक प्रश्न उधभवत असतात त्याची उत्तरं शोधायला आपण टाळाटाळ करतो...जर ते सोडलं ना तर खरच सर्व प्रश्न आपोआप सुटतील हे मात्र नक्की

मोकळा श्वास

नाही खरच वाटत असतं नेहमी की कधी मोकळा श्वास घेतोय ते...हल्ली विचारांच्या विळख्यातून मोकळा श्वास घेणं अवघड होऊन बसलंय नाही का? एखाद्या व्यक्तीत किंवा एखाद्या गोष्टीत जीव गुंतत जातो त्यावेळी हृदयाचे स्पंदनं आणखीनच वाढत असतात...एखाद्यावर आपण पूर्णपणे अवलंबून असतो त्यावेळी अनेक गोष्टी घडतात  मुळात ज्याने आपण एकटावले जातो...   अनेकदा आपण दुसऱ्यावर विसंबून असतो त्यावेळी त्याच्या मनात काय चाललंय हे आपण विचारत घेतच नाही...माझ्या बाबतीत नेहमी हेच घडत असतं... मी बऱ्याचदा दुसऱ्यावर विसंबून राहतो...कारण विश्वास....माझी सवय झाली आहे लगेच विश्वास ठेवायचं आणि मोकळं व्हायचं कधी त्या गोष्टीचा विचार नाही करत मी...एक घाणेरडी सवय मात्र मला लागली आहे गृहीत धरण्याची ...समोरची व्यक्ती देखील माझ्यासारखा विचार करत असेल का हा विचार मी करतच नाही...लगेच गृहीत धरून मोकळा होतो...का असं होतं याचा काहीच सुगावा लागत नाही...नंतर मात्र या गोष्टीचा त्रास तेवढा होतो....    गृहीत धरून चालायची सवयच झाली आहे मला...समोरच्याच्या मनातलं न जाणता मी त्या व्यक्तीला गृहीत धरून मोकळा होतो....निदान त्याचं माझ्याबद्दल मत काय आहे हे जा

विचार...

विचार म्हटलं की मनात शंका कुशंका येतंच असतात...प्रामुख्याने विचार करत असताना बऱ्याचदा आपल्या डोक्यात शंकांचे वादळ घोंगावत असतं... याच दरम्यान अनेक प्रश्न मनात येत असतात...त्यावेळी वड्याचा सूड वांग्यावर काढणं हे स्वाभाविक होऊनही जातं.यात कधी वाद विवाद होत असतात त्या दरम्यान नाती जपणं अवघड होऊन बसतं...कित्येकदा वातावरण एवढं नाजूक होऊन बसतं की त्यावर नियंत्रण मिळवणं कठीण असतं... आयुष्याच्या वाटेवर खडतर प्रवास हा होतंच असतो आणि खडतर प्रवास भोगला नाही किंवा ज्याच्या वाटेला खडतर प्रवास आला नाही त्याचं जगणंच व्यर्थ मानावं लागेल...      अनेकदा आयुष्याचा समतोल राखणं अवघड होऊन बसतं यात मग काय करावं आणि काय नाही हे सुचतच नाही....अशावेळी मात्र निश्चिन्त बसून मनाला सावरत दीर्घ श्वास घ्यायचा आणि मार्ग काढायचा प्रयत्न करायचा...एकाच गोष्टीत अडकून राहण्यापेक्षा त्यातून बाहेर कसं निघता येईल याचा विचार करायला हवा....सुरवात थोडी अवघड होईल पण नक्कीच नंतरचा प्रवास हा उत्तम असेल......

साहेब दिवाळी ......

Image
मी आणि माझा मित्र रोमांच बऱ्याच वर्षांनी भेटलो...योगायोग म्हणजे आम्ही दोघं मुंबईतच होतो...व्हाट्स अप वर त्याचा स्टेटस पहिला म्हणून त्याला मी मेसेज केला आणि आम्ही भेटायचं ठरवलं....रुईया कॉलेज च्या कट्ट्यावर भेट झाली आणि गप्पा मारत आम्ही जवळच्या गार्डन मध्ये जाऊन आमच्या गप्पा रंगू लागल्या....विशेष म्हणजे आम्ही रंगभूमीवर काम केलेले कलाकार त्यामुळे आमच्या गप्पांना चांगलाच उधाण आलं... अनेक किस्से ,गमती-जमती, सगळ्या आठवणी आठवून आठवून मनसोक्त हसत होतो...तेवढ्यात एक watchman काका आमच्या इथे आले आणि म्हणाले, "साहेब दिवाळी" मी जरा अवाक झालो कारण दिवाळी तर झाली मग आत्ता कसली दिवाळी..तेवढ्यात मी रोमांच कडे पाहिलं आणि रोमांच त्या काकांना म्हणाला की काका सध्या आम्हीच कठीण काळातून जातोय ओ आम्ही कुठून देऊ...तेवढ्यात watchman काका म्हणाले "साहेब जास्त काही नको मला फक्त 20 रुपये द्या चहा प्यायची आहे"... मी पुन्हा त्या watchman काकांकडे पाहिलं त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा तो निरागस आणि प्रामाणिकपणा पाहून जरा मलाच विचित्र वाटलं कारण गेले 8 महिने ज्यांचं हातावर पोट चालतंय त्या साऱ्यां

त्या पलीकडे

 आजच्या रात्रीच्या पलीकडे  उद्याची सकाळ आहे दुःख तर आहेच  त्याच्या पलीकडे सुख देखील आहे नाती तुटताना पाहिली आहेत त्या पलीकडे पण जाऊन पहायला हवं नाती जुळताना देखील पाहिलं आहे डोळ्यात भावना आहेत पोटात मात्र भूक आहे विसर पडतो या सर्वांचा जेव्हा डोक्यावर छत्र आहे विचारून बघा त्यांना  ज्यांचं छत्र आभाळ आहे

शोध

स्वतःला स्वतः ओळखून पाहावं कधीतरी बर्याचशा गोष्टी सापडतील कधी उणीव भासेल  तर कधी कौतुकही वाटेल अंधार देखील दिसेल तुम्ही चालत रहा उगवता सूर्य तुमची वाट पाहात असेल